
आज ४ नोव्हेंबर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांचा १६६ वा जन्मदिन... ब्रिटीश सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचा हा प्रयत्न लौकिकार्थानं फारसा यशस्वी झाला नसला तरी ब्रिटीशांना दहशत बसवण्यात फडके निश्चितपणे यशस्वी ठरले.
प्रसारमाध्यमे फारशी नसणाऱ्या १९ व्या शतकात देखील त्यांची कीर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली होती. त्यामुळेच बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांच्या आनंदमठ मध्येही फडक्यांचे कारनामे वाचण्यास मिळतात.
पकडले गेल्यानंतरही एडनच्या तुरुंगाचा दरवाजा उचकटून पळून जाण्याचा पराक्रम गाजवणारा

पण तिथून बाहेर पडताच समोर आलं ते फडक्यांचं घर... पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असणारी ही वास्तू .
"जो कोणी या वास्तूत फेरफार करील त्यास ५००० रु. दंड / ३ महिने कारावास" या स्वत:च्याच सूचनेला घाबरून बहुधा गवत नि कचरा काढण्याचं धाडस होत नसावं किंवा आत जाऊन कुणी काही फेरफार करू नये म्हणून वाटेवर गवत वाढवलेलं असावं....
दोन पावलांच्या अंतरावर दोन टोकाच्या स्थितीतली ही स्मारकं पाहून मनात शिरढोणवासियांबद्दल कृतज्ञता आणि सरकारी अनास्थेबद्दल विषण्णता दाटून आली....
माझा सुद्धा असाच एक भ्रमनिरास होणारा अनुभव मी लिहिला आहे बघ तो, खरंच वाईट अनुभव एकाच वेळी का यावेत?
ReplyDelete